Thursday, 23 July 2020

संसार रथाची चाके

लग्न होऊन औंधकरांकडे आले तेव्हा मामंजी 
(निनूच्या पप्पांचे वडील) म्हणाले होते, 
आजपासून तुम्ही दोघे संसाराच्या गाड्याची दोन चाके झालात. 

पण ह्या जुन्या समजुती आहेत. 

त्यामुळे खूप लोक मागे राहिले. 

नवे नवे आपण स्वीकारणार नाही तर पुढे जाणार कसे ? 

हा फोटो हराडकर वहिनी फिरायला परदेशी गेल्या होत्या तेव्हा त्यांनी घेतला होता. 

त्या म्हणाल्या, देश असो किंवा मग मेला तो आपला संसार, हा फोटो बघून आपण पुढे जायचे शिकलो पाहिजे. 

- शांता मधुकर औंधकर 





No comments:

Post a Comment

जंगल सफारी

 आता कुठे या वयात किल्ले बघणार ? पण हिंडणे मला आवडते.  सासूबाई भटकभवानी म्हणाल्या होत्या.. पण फक्त एकवेळच.  नंतर त्यांची हिंमत झाली नाही. या...